रत्नागिरी:- अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महारांजा पुतळा उभारणीचं रिट पिटीशन न्यायालयात प्रलंबित आह़े. पण अरबी समुद्राच्या बाजुचा महाराजांचा पहिला पुतळा रत्नदुर्ग किल्ल्यावर उभा करण्यात आला आह़े. कोकणातील सर्वात मोठय़ा शिवसृष्टीचे उर्वरित काम येत्या दोन महिन्यात मार्गी लागेल असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल़े.
रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावर 17 कोटी रुपयांच्या निधीतून नगर परिषदेच्या जागेत भव्य शिवसृष्टीची उभारणी करण्यात आली आह़े. या शिवसृष्टीच्या उद्घाटनाचा समारंभ सोमवारी सायंकाळी पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आल़ा. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, ज़ि प मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, भगवतीदेवी ट्रस्टचे सुधाकर मोंडकर, माजी नगरसेवक राजन शेटय़े, सुदेश मयेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राहूल पंडित यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होत़ी.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या शिवसृष्टीमध्ये उभारण्यात आलेल्या 24 फुटी उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल़े. याप्रसंगी आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजीने सारा परिसर झळाळून गेल़ा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा शिवगर्जनेने सारा परिसर दुमदुमल़ा हा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीतील तमाम शिवप्रेमींची रत्नदुर्ग वरील शिवसृष्टी येथे उपस्थिती होत़ी.