रखडलेल्या बसस्थानकाच्या कामाला मुहुर्त

रत्नागिरी:- रखडलेल्या रत्नागिरीच्या हायटेक बसस्थानकाच्या कामाला लवकरच मुहुर्त मिळणार आहे. जूना ठेका रद्द केल्यानंतर नवीन निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदार निश्चित केला आहे. रत्नागिरीच्या निर्माण ग्रुपला हा ठेका मिळाला आहे. त्यामुळे काही दिवसातच बसस्थानकाचे काम जोमाने सुरू होणार आहे. विशेष म्हणजे काम टाईमबॉण्ड असून पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण करण्याची ताकीद पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे समजते.

नुकतीच या संदर्भात महत्त्वाची बैठक भैय्या सामंत यांनी घेतली. १० कोटीवरून आता हे काम १८ कोटीवर गेले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत याला निधी दिला जाणार आहे. राज्यासह जिल्ह्यातील बहुतेक बसस्थानकांची कामे एमआयडीसीकडुन केली जाणार आहेत. जुना ठेकेदार काम करण्यास तयार नसल्याने त्याच्यावर कारवाई म्हणून त्याचा ठेकाच रद्द करण्यात आला आहे. त्याची देणी पुर्ण करून लवकरच फेर निविदा करण्यात आली. सहा वर्षांमध्ये बांधकामाची किम्मत वाढल्याने १० कोटी एवजी १४ कोटीचा हा प्रस्ताव महामंडळाच्या मॅनेंजिंग डायकेक्टर यांच्याकडे पाठविण्याता आला होता. हे काम रखडल्याने महाराष्ट्र नवनिर्मान सेनेसह अनेकांनी बंद असलेल्या कामावरून आंदोलन केले. लवकरात लवकर काम सुरू न केल्या येथे गुरं आणून बांधू, असा इशाराही मनसेने दिला होता.

ठेका रद्द केल्यानंतर याची फेर निविदा काढुन रत्नागिरीतील निर्माण ग्रुपला हा ठेका देण्यात आला आहे. वाढीव दरानुसार सुमारे १८ कोटीचे हे काम आहे. निर्माण ग्रुपली ताकद आणि कौशल्य पणाला लावून पावसाळ्यापूर्वी बसस्थानकाची इमारत उभारण्याचे दिव्य पार करावे लागणार आहे.याबाबतच्या सूचना भैय्या सामंत यांनी दिल्याचे समजते.

रत्नागिरी बसस्थानकाच्या कामासाठी नविन ठेकेदाराची नियुक्ती झाली आहे. जुन्या ठेकेदाराला सर्व सामान हलवायला सांगितले आहे. इमारतीचे फाऊंडेशन तयार आहे. त्यामुळे लवकरात लवकर काम सुरू होऊन ते लवकरच पुर्ण केले जाणार आहे.

प्रज्ञेश बोरसे, एसटी विभाग नियंत्रक, रत्नागिरी