रत्नागिरी:- पंधरामाड ते आलावा या किनारीभागासाठी तब्बल १६९ कोटींचा नवा बंधारा मंजूर झाल्यानंतरही मिर्या वासियांच्या नशिबी स्थलांतर कायम राहिले आहे. अलावानजिकच्या शेट्येवाडी येथे बंधरा भगदाड पडलेल्या स्थितत आहे. ठेकेदारानेही पावसाळ्यापुर्वी आवश्यक उपायोजना केलेल्या नाही. त्यामुळे काहि दिवसातच सुरु होणार्या पावसात उधानाच्या लाटांचा तडाखा बसून घराना धोका निर्माण होवू शकतो. अशी स्थिती निर्माण झाल्याने तहसिलदारांच्या सुचेने नंतर मिर्या तलाठ्यांनी ९ घर मालकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यामुळे अलावा परिसरात पु्न्हा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र वेळीच उपायोजना न झाल्यास शेट्येवाडीला उधानाच्या लाटांचा सामना करत जीव मुठीत घेवूनच चार महिने रहावे लागाणार आहे.
पंधरामाड ते आलावा या साडेतीन किलोमिटरच्या किनारी भागात राज्य शासनाने सुमारे २६९ कोटींचा बंधरा मंजूर केला आहे. पत्तन विभागाच्या अधिपत्याखाली या बंधार्यांचे काम होणार असून सुमारे पाच महिन्यांपुर्वी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते या बंधार्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बंधार्यांचे काम तात्काळ सुरु करा,असे आदेश ना.पवार यांनी दिले होते. मात्र गेले पाच महिने काम संथगतीने सुरु राहिले. आतापर्यंत केवळ टेट्रापॉड तयार करण्याचे काम ठेकेदाराने सुरु केले आहे.तर पावसाळ्यापुर्वी सात धोकादायक ठिकाणी पुर्वीप्रमाणे दगड टाकून समुद्राच्या लाटा रोखण्याचे काम करण्यात येणार होते. मात्र अलावा शेट्येवाडी जवळ असलेले भगदाड अध्याप कायम असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
यावर्षीच्या पावसात उधाणाच्या भरतीने बंधार्याची धुप होण्याच्या शक्यतेने बंधार्याचा सर्व्हे करून तत्काळ दुरूस्तीबाबत खबरदारी घ्या अशा सुचाना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पत्तन विभागाने सर्व्हे करून पंधरामाड येथे १, भाटीमिर्या ३, जाकीमिर्या २ आणि आलावा २ हे सात स्पॉट निश्चित केले होते. मात्र आलावा येथिल भगदाड ठेकेदाराने तसेच ठेवले आहे. पत्तन विभागाने बंधार्याला पडलेले भगदाड भरुन काढण्याची सुचना देवून तेथील काम पुर्ण करुन घेणे अपेक्षित असताना प्रशासनाने ग्रामस्थांनाच सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटीसा बजावल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
ज्या ग्रामस्थांना प्रशासनाने नोटीसी बजावल्या आहेत. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासन दरवर्षी अशा नोटीसा देते. मात्र बंधर्याचे काम जैसे थे आहे. दरवर्षी पावसाळ्यातच प्रशासनाला मिर्यावासियांची आठवण होते. सुमारे १६९ कोटीचे काम मंजूर होवून ही प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार नसेल तर या कामाचा यावर्षी तरी मिर्यावासियांना उपयोग होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.