राज्य शासनाच्या उद्दिष्टपेक्षा जास्त मातांना मिळाला लाभ
रत्नागिरी:- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात 01जानेवारी 20217 पासून कार्यान्वीत केली आहे. सदर योजना केंद्र पुरस्कृत असून या योजनेमध्ये शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे. योजनेअंतर्गत कुटुंबातील पहिल्या जीवंत अपत्यापर्यंत समाजातील सर्व स्तरातील मातांना 5000/- रुपये एवढी रक्कम तीन टप्प्यामध्ये आधार संलग्न बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये डीबीटीव्दारे वर्ग करण्यात येते. रत्नागिरी जिल्हयामध्ये राज्यस्तरावरुन देण्यात आलेले मातांचे 35,484 उद्दिष्टांपेक्षा एकूण 36 हजार 307 मातांना एकूण रु. 15 कोटी 33 लाख 16 हजार लाभार्थीच्या खात्यात या योजनेतून अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. २) जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट येऊन तो नियंत्रणात रहावा. ३) प्रसुतीपूर्व प्रसुतीपश्चात महिलेला आपली बुडीत मजूरी मिळावी यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना कार्यान्वीत केली आहे.
योजनेचे निकष
शासनाने अधिसुचित केलेल्या संस्थेत ( शासकिय रुग्णालये) नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस तिच्या पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत एकदाच लाभ अनुज्ञेय असून, लाभाची र.रु.5000/- इतकी आहे. वेतनासह मातृत्व रजा मिळवणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय रहाणार नाही. पात्र लाभार्थी गर्भवती महिलेस खाली दर्शविल्याप्रमाणे रु.5000/- बैंक सलग्न खात्यात किंवा पोस्ट खात्यात ( DBT Through PFMS) व्दारे समाजातील सर्व स्तरातील मातांना तीन टप्प्यांत जमा केली जाते.
लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, आधार सलग्न बँक किंवा पोस्ट खाते, माता व बाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र, बाळाचे लसीकरण कार्ड.
ही योजना उत्तमरितीने राबविणेसाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच आरोग्य संस्थेच्या परिसरामध्ये पोस्टर्स, बॅनर्स, वर्तमानपत्रे व रेडिओ प्रक्षेपणाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा यांचा सहभाग घेण्यात येतो. सद्यस्थित रत्नागिरी जिल्हयामध्ये राज्यस्तरावरुन देण्यात आलेले मातांचे 35484 उद्दिष्टांपेक्षा एकूण 36307 मातांना एकूण रु.15,33,16,000/- लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. जिल्हयात कोविड साथीच्या लॉकडाऊन काळातही व नागरिकांचा तसेच पात्र मातांचा उत्तम प्रतिसाद मिळाला त्यामुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली.
मा. श्री. देवेंदर सिंह मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी, मा.श्री.किर्ती किरण पुजार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. राजन शेळके, माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी व श्री. प्रविण डुब्बेवार जिल्हा कार्यक्रम समन्वयक जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मातांना लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.