रत्नागिरी:- घटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्यामुळे काजळी नदीचा रुद्रावतार थांबता थांबेना. जवळपास 30 तास होऊन गेले तरी चांदेराई बाजारपेठेतील पाणी ओसरले नव्हते. उलट पाणी वाढल्यामुळे चांडदेराईतील 15 घरातील साहित्य मध्यरात्री सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी कसरत करावी लागली. यात एका कोरोना बाधित रुग्णासह प्रौढा चा समावेश आहे.
रत्नागिरी तालुक्यात पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरीही साखरपा परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी हाईटाईड यामुळे बुधवारी रात्री काजळी नदीला आलेला पूर तीस तास झाले तरीही अजून ओसरलेला नाही. गुरुवारी मध्यरात्री चांदेराई बाजारात पाण्याची पातळी वाढल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. बाजारपेठेतील शंभर हुन अधिक दुकान अजूनही पाण्यातच आहेत. त्यात काल आणखी 15 घरांची भर पडली. पाणी वाढू लागल्यावर रात्री जगवाणाऱ्या ग्रामस्थांनी घरातील साहित्य रात्री एक वाजता पाण्याचा जोर वाढत गेला. त्यांच्या मदतीला अन्य ग्रामस्थ ही होते. टीव्ही, फ्रिज सह भांडी सुद्धा उचलवी लागली. या परिसरात असलेली गणपती कारखान्यातील मुर्त्याही सुरक्षित ठिकाणी हलवाव्या लागल्या. चांदेराई याठिकाणी एक वयोवृद्ध आणि होम आयसोलेश असलेला कोरोना बाधितला सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी लागली. या गोंधळात ग्रामस्थांनी दोन रात्री जागून काढल्या. चांदेराई बरोबर हरचेरी परिसरातील 25 घरात पाणी शिरलं होते. तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
काजळी नदीतील गाळ हाच पूर परिस्थितीला कारणीभून असल्याचे मत माजी सरपंच दादा दळी यांनी व्यक्त केलं. नदी पात्रातील गाळ काढला तर प्रश्न सुटेल असा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान काजळी किनारी असलेल्या तोणदे, टेंबे, पोमेंडी, सोमेश्वर या परिसरात पुरच पाणी स्थिर होते. अनेकांनी रात्र जागून काढली.