बॅनर फाडून नुकसान केल्याप्रकरणी संशयितांची आरोपातून निर्दोष मुक्तता 

रत्नागिरी:-  दीड वर्षापूर्वी कोरोना कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत गैरकायदा जमाव करून जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी शहरातील मारुती मंदिर परिसरात येथे लावण्यात आलेले बॅनर फाडून नुकसान केल्याप्रकरणातील संशियतांची न्यायालयाने  निर्दोष मुक्तता केली. 

आमदार राजन साळवी (५४, रा . खालची आळी, रत्नागिरी) , संजय साळवी (५० , रा . तेली आळी, रत्नागिरी ) , परेश खातू ( ४३ , रा . संगमेश्वर ) , प्रसाद सावंत ( ४० , रा . शिवाजी नगर , रत्नागिरी ) , प्रकाश रसाळ ( ६६ , रा . नाचणे , रत्नागिरी ) , प्रशांत साळुंखे ( ४५ , रा . साळवीस्टॉप , रत्नागिरी ) आणि इतर ८ ते १० जण अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत . संशयितांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भा.दं. वि . कलम १४३ , २६ ९ , ४२७ , महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ ( १ ) ( ३ ) चा भंग क , १३५ प्रमाणे गुन्हा केल्याचा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते . याप्रकरणी सोमवारी निकाल देताना न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली.