बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्या

डॉ. बी. एन. पाटील; परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बैठक

रत्नागिरी:- दहावी, बारावीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होणाऱ आहेत. एसटी कर्मचाऱ्याच्या बंद मुळे परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी फेऱ्या वेळेतच सोडण्याच्या सूचना जिल्ह्यातील विभाग नियंत्रकांना दिल्या. ज्या भागात फेऱ्या सुरू नाहीत, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, अशा शाळांनी संबधित तालुक्यातील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधा असे शिक्षणाधिकारी  यांनी मुख्याध्यापकांना कळवावे. रस्त्यावर विद्यार्थ्यां दिसल्यास चालक-वाहकांनी गाडी थांबवुन बसमध्ये प्रवेश द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. एसटी कर्मचारी बंद आणि उद्यापासून सुरु होणाऱ्या १२ वीच्या परिक्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्राच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली. या  बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. रत्नागिरी, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ हे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक  (१० वी) व उच्च माध्यमिक  (१२ वी) शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा उद्या (ता.४) मार्च  पासून सुरु होत आहेत. परीक्षा कालावधीत एसटी महामंडळाच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांना वेळेवर परीक्षा केंद्रात पोहोचता यावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन पाटील यांनी बैठक घेऊन संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
ते म्हणाले, उद्या एसटी फेऱ्या वेळेतच सोडण्याबाबत विभाग नियंत्रक यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुखांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या भागात फेऱ्या सुरू  नाहीत, मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, अशा शाळांनी संबधित तालुक्यातील आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे शिक्षणाधिकारी  यांनी मुख्याध्यापकांना कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

रत्नागिरी विभागातील आगार व्यस्थापकांचे संपर्कसाठीचे भ्रम्हणध्वनी दापोली- मृदुला जाधव-9922926407, खेड-प्रशांत करवंदे – 9561358127, चिपळूण- रणजित राजेशिर्के – 8287358672, गुहागर-वैभव कांबळे – 9822029294, देवरुख – राजेश पाथरे- 9420155511, रत्नागिरी – रमाकांत शिंदे – 8237812448, लांजा – संदीप पाटील 9657112554, राजापूर – सागर गाडे – 9822796976, मंडणगड – हनुमंत फडतरे – 9423885492.