रत्नागिरी:- मागील काही दिवसांच्या तुलनेत सोमवारी जिल्ह्यात सापडणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र असताना मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 662 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातीळ 325 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 337 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 662 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 20 हजार 278 झाली आहे. आज जिल्ह्यात तब्बल 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 497 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. सोमवारी मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याचे चित्र होते. मात्र हा दिलासा काही तासांचाच ठरला. नव्याने आलेल्या आकडेवारीने बाधित रुग्णांचा उच्चांक गाठला आहे. नव्याने 662 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 20 हजार 278 जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 325 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 337 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 12 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 606 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.98 % आहे. आज जिल्ह्यात 497 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 13659 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 67.35 टक्के आहे. आज 1113 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 1,23,385 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 662 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 153, दापोली 62, खेड 56, गुहागर 132, चिपळूण 94, संगमेश्वर 81, राजापूर 50 आणि लांजा तालुक्यात 34 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 14.11% आहे.









