रत्नागिरी:- कीडरोग आणि वातावरणातील बदलाचा आंबा पिकाला फटका बसत आहे. फवारणी करण्यात येणारी किटकनाशके प्रभावहीन ठरत आहेत. त्यामुळे फुलकिडीला (थ्रीप्स) आळा बसत नाही असे चित्र आहे. याबाबत आवश्यक संशोधन होण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचतच नाहीत. शासन पातळीवर आंबा पीक आणि त्यातील अडचणी याबाबत सविस्तर चर्चा होण्याची गरज आहे.
प्रभावहीन ठरलेल्या किटकनाशकांच्या बिलाची रक्कम बागायतदारांकडून घेतली जाऊ नये, असे आवाहन होऊनही अद्यापपर्यंत याबाबत सकारात्मक हालचाली झ्ाालेल्या दिसत नाहीत. रोखीने औषधे खरेदी केलेल्या बागायतदारांची रक्कमही परत मिळालेली नाही. त्यामुळे बागायतदारांसमोर अडचण वाढली आहे. त्यासाठी शासन पातळीवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा बागायतदारांनी व्यक्त केली.









