रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 596 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 277 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 396 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 596 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 24 हजार 222 झाली आहे. आज तब्बल 17 मृत्यूंची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज पाचशेपेक्षा अधिक जण कोरोना बाधित होत आहेत. नव्याने आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात 596 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 24 हजार 222 जाऊन पोहचली आहे. रविवारी आलेल्या अहवालात 277 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 396 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 17 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 715 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.95 % आहे. आज जिल्ह्यात 521 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 16912 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 69.82 टक्के आहे. मागील चोवीस तासात 592 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 1,31,408 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 596 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 84, दापोली 45, खेड 68, गुहागर 48, चिपळूण 246, संगमेश्वर 38, मंडणगड 16, राजापूर 25 आणि लांजा तालुक्यात 26 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 15.56% आहे.