पाच दिवसात कोरोना रुग्णसंख्या अकराशे पार; नव्याने 227 कोरोनाबाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोना बाधित रुग्णसंख्येने दोनशेचा टप्पा पार केला आहे. पाच दिवसात जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 1हजार 55 इतकी झाली आहे. 24 तासात 1 हजार 976 अहवालांमध्ये तब्बल 227 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 1100 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 80 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 77 हजार 374 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.49 टक्के आहे. नव्याने 227 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 81 हजार 028 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 895 तर संस्थात्मक विलगीकरणात 205 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या चोवीस तासात 1 हजार 976 कोरोना अहवाल निगेटीव्ह आले असून आतापर्यंत 8,80,564 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.