जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील; एकत्रित काम करणे आवश्यक
रत्नागिरी:- जिल्हा पर्यटन क्षेत्रात विकसीत करण्यासाठी मोठया प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे जिल्हा पर्यटनदृष्टया विकसीत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे गरजेच आहे. प्रत्येकांनी पर्यटनाच्यादृष्टीने आपल्या भागातील क्षेत्राचा ॲक्शन प्लॅन तयार करुन आवश्यकता (रिक्वायरमेंट) सादर कराव्यात, जेणेकरुन पर्यटन आराखडा तयार करताना त्याचा सहभाग घेऊन तो कृतीत आणता येईल, असे मत जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये आदि संबधित अधिकारी तसेच पर्यटन क्षेत्रात काम करणारे मान्यंवर व्यक्ती तसेच संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातूनही जिल्हयातील पर्यटन क्षेत्राशी संबधित व्यक्ती, संस्थेचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रात काम करणारे व्यक्ती तसेच संस्थेंच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पर्यटन क्षेत्रात काम करीत असताना येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.जिल्हाधिकारी म्हणाले, रत्नागिरी जिल्हा पर्यटन क्षेत्रात विकसीत करण्यासाठी मोठया प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे जिल्हा पर्यटनदृष्टया विकसीत करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे गरजेच आहे. प्रत्येकांनी पर्यटनाच्यादृष्टीने आपल्या भागातील क्षेत्राचा ॲक्शन प्लॅन तयार करुन आवश्यकता (रिक्वायरमेंट) सादर कराव्यात जेणेकरुन पर्यटन आराखडा तयार करताना त्याचा सहभाग घेऊन तो कृतीत आणता येईल. परावनंगी संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील आणि आपल्याला लवकरात लवकर पर्यटनांशी संलग्न परावनग्या देण्याचा प्रयत्न केला जाईल. शासनाकडून आपल्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. जिल्हयात पर्यटन अधिक विकसीत करण्याच्यादृष्टीने आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी दिले. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये यांनी पर्यटनासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.









