दिलासादायक; जिल्ह्यात 24 तासात अवघे 7 रुग्ण

रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात अवघे 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 371 बळी घेतले आहेत.

मागील दोन दिवसात कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग वाढला होता. मात्र, मागील 24 तासात नव्याने 7  रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 463 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 435 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 92 हजार 947 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 28 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 863 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेलेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 371 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.26 टक्के आहे.