रत्नागिरी:- नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी चार नामनिर्देशन पात्र दाखल केली आहेत. आतापर्यंत रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून तीन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर केली असून या तीन पैकी दोन उमेदवार अपक्ष आहेत.
मंगळवारी विनायक भाऊराव राऊत यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून एकूण ३ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. तसेच अमृत अनंत तांबडे यांनी अपक्ष म्हणून १ नामनिर्देशन पत्र दाखल केले. अशी एकूण दोन उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र आज दाखल केली. आजपर्यंत एकूण तीन उमेदवारांची ५ नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली. यापूर्वी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला होता.