रत्नागिरी:- वातावरणातील बदलांचे परिणाम समुद्रातील मासळीवर होत आहेत. सध्या बांगडा, कोळंबी मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याने दर वधारले आहेत. तर ट्रॉलिंगच्या नौकांना बेबी म्हाकुळ मासा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आवक वाढल्यामुळे म्हाकुळचा दर किलोला 100 ते 110 रुपयांपर्यंत आला आहे. व्यावसायीकांकडून योग्य दर मिळत नसल्याचे स्थानिक मच्छीमारांचे मत आहे.
ऑगस्ट महिन्यात गिलनेट, ट्रॉलिंगद्वारे तर 1 सप्टेंबरपासून पर्ससिननेट जाळीचा वापर करुन मासेमारी सुरु झाली आहे. यंदा वादळी वारे, पाऊस अनियमित आहे. खोल समुद्रातील मासा किनार्याकडे येण्यासाठीचे वार अजुनही वाहू लागलेले नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मिळणारा मासा अपेक्षित जाळ्यात सापडलेला नाही. श्रावण म
हिना असल्यामुळे अनेक मच्छीमारी नौका बंदरावरच उभ्या होत्या. तर काही नौकां मासेमारीला जात आहेत, परंतु त्यांना अपेक्षित मासे मिळत नाहीत. हंगामाच्या सुरवातीला मिळणारा बांगडा मासा आता कमी झालेला आहेत. गिलनेटच्या नौकांना अवघा 3 ते 4 किलो बांगडा मिळत आहे. त्यामुळे मच्छीमारांचा खर्चही वसुल होत नाही. अनेक नौ
का बंदरावच उभ्या आहेत. सध्या मासळी बाजारातही बांगड्याचा दर 100 ते 120 रुपये किलो तर टायनी कोळंबीचा दर 100 रुपयांवरुन 150 रुपये किलोने विकली जात आहे. ट्रॉलिंगच्या नौकांना बेबी म्हाकुळ मोठ्याप्रमाणात मिळत आहे. एका नौकेला साधारणपणे एक ते दिड टन म्हाकुळ मिळत आहे. परंतु किलोचा दर 100 ते 110 रुपयेच आहे. ह
ा दर 300 ते 350 रुपये किलो असणे अपेक्षित आहे. एका फेरीला नौकांना 1 ते सव्वा लाख रुपये मिळत आहेत. त्यामधून खर्च वजा जाता अपेक्षित फायदा मिळत नाही. मिळणार्या मासळीमधून तीन लाखाहून अधिक उत्पन्न अपेक्षित आहे. गिलनेटने मासेमारी करणारे श्रीदत्त भुते म्हणाले, किनार्यापासून दोन किमी अंतराच्या परिसरात अपेक
्षित मासळी मिळत नाही. त्यामुळे गिलनेटने मासेमारी करणार्यांनी नौका उभ्या करून ठेवल्या आहेत. एका फेरीचा खर्चही हाती येत नाही.
कोट
समुद्रात सध्या बेबी म्हाकुळ मासा मिळत आहे. पण अपेक्षित दर मच्छीमारांना मिळत नसल्याने फायदाही होत नाही. मासळी खरेदीचे दर व्यापार्यांकडून ठरवले जातात. त्यावर कुणाचेच नियंत्रण नसते.
- आप्पा वांदरकर, मच्छीमार