रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 431 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात दोन रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून पर्यंत कोरोनाने 338 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 9 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 346 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 431 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 62 हजार 207 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 11 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 876 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा बळी घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 338 वर पोचली आहे. जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.97 टक्के आहे.









