रत्नागिरी:-नव्याने प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यात 60 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 992 झाली आहे. तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 591 इतकी आहे.
नव्याने सापडलेल्या 60 रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 20, कामथे २८, कळबणी २, गुहागर ६, दापोली २ आणि ॲन्टीजेन टेस्ट केलेल्या २ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान कोरोना बाधित तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये कोकणनगर रत्नागिरी येथील 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच राजापूर येथील 58 वर्षीय तर हर्णे, दापोली येथील 67 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 66 झाली आहे.
दरम्यान मंगळवारी 31 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 335 झाली आहे. मंगळवारी बरे झालेल्या रुग्णांमध्ये कोव्हीड रुग्णालय 6, समाजकल्याण मधील 9 आणि केकेव्ही, दापोली येथील 16 रुग्ण आहे.