रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची घोषणा
रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी रात्रीच्या लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. पुरवणी आदेशानुसार 31 मार्च 2021 पर्यंत हा कालावधी असणार आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्हयामध्ये नियंत्रणात ठेवण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू आहे. सार्वजनिक हिताच्यादृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये आदेश जारी करुन त्यामध्ये सुधारणा करणेसाठी 22 व 24 फेब्रुवारी 2021 अन्वये पुरवणी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 31 मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यात लॉकडाउन वाढविण्यात आला आहे.