जिल्ह्यात 24 तासात 51 जण कोरोना पॉझिटिव्ह 

रत्नागिरी:- सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात केवळ 51 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 44 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 73 हजार 337 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.25 टक्के आहे. नव्याने 51 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 76 हजार 993 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 1 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 373 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.08 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 525 तर संस्थात्मक विलीकरणात 424 रुग्ण उपचार घेत आहेत.