रत्नागिरी:-रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 46 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 71 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 72 हजार 735 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 29 टक्के आहे. नव्याने 46 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 76 हजार 332 इतकी झाली आहे.
कोरोनाने नव्याने तीन मृत्यूची नोंद झाली आहे. यातील 2 मृत्यू 24 तासातील तर एक मृत्यू या पूर्वीचा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 355 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.09 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 487 तर संस्थात्मक विलीकरणात 369 रुग्ण उपचार घेत आहेत.