जिल्ह्यात 24 तासात 45 नवे पॉझिटिव्ह; शून्य मृत्यू 

रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 45 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने शून्य मृत्यू झाले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात 14 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 75 हजार 732 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.41 टक्के आहे. नव्याने 45 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 549 इतकी झाली आहे. 

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने शून्य रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 442 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 236 तर संस्थात्मक विलगीकरणात 135  रुग्ण उपचार घेत आहेत.