रत्नागिरी:- मागील चोवीस तासात पुन्हा 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 204 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 324 वर पोचली आहे.
नव्याने 20 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 993 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 20 रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 9, दापोली 3, गुहागर 4, चिपळूण 3 आणि संगमेश्वर मधील 1 रुग्णाचा समावेश आहे. 20 पैकी 12 आरटीपीसीआर तर 8 जण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. मागील चोवीस तासात 204 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 57 हजार 427 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 20 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 549 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 324 झाली असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 95.06 टक्के आहे