रत्नागिरी:- मागील 24 तासात 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 14 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 73 हजार 481 इतकी झाली आहे. 24 तासात 5 हजार 291 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 5 लाख 76 हजार 571 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यँत 69 हजार 489 रुग्ण बरे झाले आहेत. तर 24 तासात 127 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.
जिल्ह्यात नव्याने 14 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 14 पैकी 24 तासातील 3 त्यापूर्वीचे 11 असे 14 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 164 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.94 तर रिकव्हरी दर 94.57 टक्के आहे.