रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत तब्बल 144 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनाने 340 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 11 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 406 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 144 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 63 हजार 952 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 16 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 951 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा बळी घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 340 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 95.16 टक्के आहे.









