जिल्ह्यात 24 तासात 106 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 106 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. या कालावधीत दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 69 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 72 हजार 502 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 26 टक्के आहे. नव्याने 106 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 76 हजार 107 इतकी झाली आहे. 

कोरोनाने होणाऱ्या मृत्यूबाबत बुधवारी दिलासा मिळाला होता. बुधवारी एकही मृत्यू झाला नव्हता. गुरुवारी 2 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 345 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.08 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 492 तर संस्थात्मक विलीकरणात 305 रुग्ण उपचार घेत आहेत.