रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येत गेल्या 24 तासात लक्षणीय वाढ झाली आहे. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 477 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 477 पैकी 189 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 288 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 477 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 17 हजार पार झाली आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 477 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 17 हजार 051 वर जाऊन पोहचली आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 189 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 288 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 13 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 488 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.86 % आहे. आज जिल्ह्यात 123 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेट 73.24 टक्के आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 477 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 75, दापोली 9, खेड 39, गुहागर 95, चिपळूण 55, संगमेश्वर 107, मंडणगड 6, राजापूर 23 आणि लांजा तालुक्यात 68 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 12.71% आहे.









