जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शंभराच्या आत; पाच मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- अनेक महिन्यानंतर जिल्ह्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शंभराच्या आत आली आहे. मागील 24 तासात 91 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे चित्र आहे. 

नव्याने 91 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 74 हजार 765 इतकी झाली आहे. 24 तासात 100 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 70 हजार 865 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात नव्याने 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 5 पैकी 24 तासातील केवळ 1 तर यापूर्वीचे 4 मृत्यू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 240 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.99 तर रिकव्हरी दर 94.78 टक्के आहे. 

कोरोनाची चाचणी केलेल्यापैकी 3 हजार 213 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 6 लाख 23 हजार 418 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या गृह विलीगिकरणात 855 तर संस्थात्मक विलीगिकरणात 743 रुग्ण उपचार घेत आहेत.