जिल्ह्यात नव्याने 47 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- रविवारी आलेल्या जिल्ह्यात 47 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 2 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 77 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 75 हजार 88 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.06 टक्के आहे. नव्याने 47 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 170 इतकी झाली आहे. 

कोरोनाने 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 428 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 347 तर संस्थात्मक विलगीकरणात 307 रुग्ण उपचार घेत आहेत.