जिल्ह्यात नव्याने 147 कोरोनाबाधित; 3 रुग्णांचा मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात 975 अहवालांमध्ये तब्बल 147 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 145 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 246 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 77 हजार 774 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.57 टक्के आहे. नव्याने 147 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 81 हजार 379 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत 2 हजार 495 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.07 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 899 तर संस्थात्मक विलगीकरणात 209 रुग्ण उपचार घेत आहेत.