जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूकीत ६८.१४ टक्के मतदान

गुहागरला सर्वाधिक ७५.२६ तर सर्वात कमी रत्नागिरी ५५.०९ टक्के

रत्नागिरी:– जिल्ह्यातील ४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (२ डिसेंबर २०२५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली. सातही ठिकाणी मिळून एकूण ६८.१४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एकूण १,००,४२६ मतदारांनी आपला हक्क बजावला, ज्यात ५१,२२७ महिला आणि ४९,१९८ पुरुषांचा समावेश आहे, तसेच एक इतर मतदारानेही मतदान केले.

​या निवडणुकीत नगरपंचायतींमध्ये मतदारांचा अधिक उत्साह दिसून आला. गुहागर नगरपंचायत येथे सर्वाधिक ७५.२६ टक्के मतदान झाले, तर राजापूर नगरपरिषद (७४.५५%) आणि देवरुख नगरपंचायत (७४.३३%) येथेही जोरदार मतदान झाले. याउलट, जिल्हा मुख्यालयातील रत्नागिरी नगरपरिषद येथे केवळ ५५.०९ टक्के मतदान होऊन ते सर्वात कमी ठरले.

नगरपरिषद रत्नागिरी – पुरुष ३१३२४, महिला ३३४२१ इतर १ एकूण मतदान ६४७४६ पैकी झालेले मतदान – पुरुष १७२४५, महिला १८४२२, इतर १ एकूण- ३५६६८, ५५.०९ टक्के

चिपळूण पुरुष २०९८६, महिला २१५९६ एकूण मतदान ४२५८२ पैकी झालेले मतदान – पुरुष १३४३९, महिला १३८७८ एकूण २७३१७, ६४.१५ टक्के
खेड पुरुष ६५००, महिला ७४९५ एकूण मतदान १३९९५ पैकी झालेले मतदान – पुरुष ४०६०, महिला ४६९१ एकूण ८७५१, ६२.५३ टक्के
राजापूर पुरुष ३९२४, महिला ४२१९ एकूण मतदान ८१४३ पैकी झालेले मतदान – पुरुष ३०९२, महिला २९७९ एकूण ६०७१, ७४.५५ टक्के
नगरपंचायत लांजा पुरुष ७०८७, महिला ७१४५ एकूण मतदान १४२३२ पैकी झालेले मतदान – परुष ५१२३, महिला ४९९० एकूण १०११३, ७१.०६ टक्के
देवरुख पुरुष ५२०८, महिला ५५८१ एकूण मतदान १०७९८ पैकी झालेले मतदान – पुरुष ३९९५, महिला ४०२५ एकूण ८०२०, ७४.३३ टक्के
गुहागर पुरुष २८५६, महिला ३१०५ एकूण मतदान ५९६१ पैकी झालेले मतदान –पुरुष २२४४, महिला २२४२ एकूण ४४८६, ७५.२६ टक्के.