रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मागील चोवीस तासात तब्बल 218 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे तर केवळ 14 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र आहे. नव्याने 14 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 582 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 218 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 50 हजार 778 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
शनिवारी 26 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 107 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.46 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 6, दापोली 3, खेड 2 आणि चिपळूण तालुक्यातील 3 बाधितांचा समावेश आहे.