रत्नागिरी:-मागील 24 तासात जिल्ह्यात 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 147 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही.
मागील 24 तासात नव्याने 19 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 266 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 147 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 60 हजार 775 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 10 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 812 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला नाही त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 331 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 95.10 टक्के आहे.









