रत्नागिरी:- मागील 24 तासात 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 169 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. या कालावधीत एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.
मागील 24 तासात नव्याने 15 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 206 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 169 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 59 हजार 932 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 19 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 728 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 328 झाली असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.81 टक्के आहे.