रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 418 तपासण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. शुक्रवार वगळता जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर स्थिर आहे. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही.
नव्याने एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही. आतापर्यंत 81 हजार 932 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 97 टक्के आहे. नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 467 इतकी स्थिर आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 1 तर संस्थात्मक विलीगिकरणात एकही रुग्ण नाही.