जिल्ह्यात कोरोनाचे केवळ चार पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यत केवळ चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 57 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. 

मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. नव्याने 4 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 498 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 57 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 49 हजार 217 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 10 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 7 हजार 983 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 93.86 टक्के आहे.