जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू

रत्नागिरी:- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आजपासून (ता. 25) आठ फेब्रवारीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी नुकताच जारी केला आहे. 

समाज माध्यमातून आक्षेपार्ह पाेस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे राज्यासह जिल्ह्या-जिल्ह्यात तणावचं वातावरण निर्माण हाेत आहे. या घटनांचा पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात देखील उमटू शकतील अशी शक्यता पाेलिस प्रशासनास वाटू लागल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला.

या पत्रव्यवहार नूसार जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने रत्नागिरी 25 जानेवारी ते आठ फेब्रुवारी या कालावधीत मनाई आदेश लागु केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदाेलन सारखे प्रकार टाळावेत, करु नयेत.