जिल्ह्यातील 2 लाख 18 हजार विद्यार्थ्यांची आधारकार्ड वैधता पूर्ण

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी देण्यात आलेल्या मुदतीत रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 74 शाळांमधील महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या शाळांतील 2 लाख 24,067 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 18,670 विद्यार्थ्यांची आधारकार्ड वैधता पूर्ण झाली आहे. ही कार्यवाही 97.59 टक्के झालेली आहे.

शालेय विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी 15 जूनची मुदत देण्यात आली होती. त्यात काही त्रुटी निर्माण झाल्यास अधिकाऱयांकडून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. आधार वैधतेसाठी मुदत मिळाल्याने विद्यार्थी व शिक्षकांना दिलासा मिळाला. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठीची संचमान्यता आधार वैधतेनुसार करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार गेले वर्षभर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डवरील तपशिलातील त्रुटी दुरूस्त करणे आदी प्रक्रिया सुरू आहे. मात्र विद्यार्थ्यांची आधार कार्ड अवैध ठरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याचे दिसून आले आहे.

आधार वैधतेनुसार संचमान्यता केल्यास आणि विद्यार्थीसंख्या कमी झाल्यास शिक्षकांची पदे कमी होण्याची भिती आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात आधार वैधतेसाठी 15 जूनची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आधार पडताळणीनुसार संच मान्यता करण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर 2022 हा दिनांक गृहीत धरून आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संचमान्यता करताना संस्थेने काही तफावत निदर्शनास आणून दिल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकाऱयांने शहनिशा करून निर्णय घ्यावा. तसेच सबंधित प्रकरणे शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
विद्यार्थी आधार वैधतेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात समाधानकारक कार्यवाही झालेली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात 97.59 टक्के आधार वैधता कार्यवाही पूर्ण झालेली आहे. राज्यात रत्नागिरीने दुसरा कमांक पटकावला आहे. प्रथम कमांकावर सिंधुदूर्ग जिल्हा राहिला आहे. रत्नागिरी जिल्ह्dयात 3 हजार 74 शाळांमधील 2 लाख 24 हजार 67 विद्यार्थ्यांची आधार वेधता कार्यवाहीत 2 लाख 18 हजार 670 आधार वैधता पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये आधार वेधतेत चिपळूण 96.38 टक्के, दापोली 98.37 टक्के, गुहागर 97.98 टक्के, खेड 97.84 टक्के, लांजा 99.02 टक्के, मंडणगड 95.84 टक्के, राजापूर 97.90 टक्के, रत्नागिरी 97.16 टक्के, संगमेश्वर 99.05 टक्के कार्यवाही झालेली आहे.