रत्नागिरी:- मागील 24 तासात 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर याच कालावधीत 211 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आज 25 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 8 हजार 791 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यानंतर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 95.07 टक्के आहे.
मागील 24 तासात नव्याने 16 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 9 हजार 246 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 211 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 60 हजार 536 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 25 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 791 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात रिकव्हरी रेट 95.07 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 330 झाली आहे.