जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील काळबादेवी येथे घरासमोरील जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश जयवंत जोशी (रा. जोशीवाडी-काळबादेवी, रत्नागिरी) असे तक्रार दाखल करणाऱ्यांचे नाव आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी दिलीप शंकर जोशी (रा. जोशीवाडी काळबादेवी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

गणेश जोशी यांचे काळबादेवी जोशीवाडी येथे घर असून कामानिमित्त ते मुंबई येथे वास्तव्य करतात. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी गणेश जोशी हे आपल्या घरी आले होते. यावेळी घरासमोरील त्यांच्या जागेत माशाचे जाळे टाकल्याचे गणेश यांना आढळून आले. हे जाळे उचलण्यात यावे, अशी विनंती दिलीप जोशी यांना तक्रारदार यांनी केली. असे असतानाही जोशींनी जाळे उचलले नाही. त्यानुसार गणेश यांनी दिलीप यांच्याविरुद्ध जागेमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केली.