चोवीस तासात तब्बल 23 जणांना कोरोनाची लागण

रत्नागिरी:- मागील चोवीस तासात तब्बल 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 595 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही.
 

वाढलेली रुग्णसंख्या रत्नागिरीकरांची चिंता वाढवणारी आहे. नव्याने 23 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 689 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 595 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 53 हजार 693 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 6 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 206 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 319 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.44 टक्के आहे.