रत्नागिरी:- रत्नागिरी‚कोल्हापूर मार्गावरील कुवारबाव नजीकच्या गयाळवाडी येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत प्रसाद प्रकाश यादव (२८ रा.शांतीनगर ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातानंतर परजिल्ह्यातील असलेला बोलेरो चालक गाडीसह फरारी झाला .









