खाडीत कालवं काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे येथील खाडीत कालव काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा.सुमारास घडली.

जिलानी राजेंद्र डोर्लेकर (43, रा.गावडे-आंबेरे, रत्नागिरी) असे खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ती नेहमी प्रमाणे घराशेजारीच असलेल्या पूर्णगड खाडीत कालवं काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला फिट आल्यामुळे ती खाडीच्या पाण्यात बूडून तिचा मृत्यू झाला. ही बाब सकाळी 8 वा.सुमारास तिच्या मुलाच्या निदर्शनास येताच त्याने तिला तातडीने पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी जिलानी डोर्लेकर यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.