१६० किलोमीटरच्या पाईप लाईनसाठी जागेची पहाणी
रत्नागिरी:- कोयना अवजलाचे पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. १६० किलोमीटरच्या पाईप लाईनच्या जागेची पहाणी पूर्ण झाली आहे. आता पुढील कामही प्रगतीपथावर आहे.कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात हा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सूरु झाल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून जीओ इन्फो कंपनीकडून प्राथमिक सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. १६० किलोमीटर पैकी ९० टक्के पाईप लाईन महामार्गाजवUून जाणार आहे. चिपUूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर अशा तालुक्यातून पाईप लाईन जाणार आहे. बारसू रिफायनरीसाठी कोयनेचे अवजल पाणी वापरले जाणार आहे.
बारसू रिफायनरीसाठी कोयना धरणातून पाणी आणण्यात येईल. त्यासाठी १ कोटी ९० लाख खर्च करून सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. कोयनतून ६७.५० टिएमसी पाणी थेट समुद्राला मिUते. कोयना अवजलातून वाया जाणारे ७.५० टीएमसी पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार आहे. गुरुत्वाकर्षणाने वर्षाला ७.५ टीएमसी पाणी पुरवठा करता येईल का? या संदर्भातील सर्व्हेक्षण आघाडीवर आहे.
राजापूर तालुक्यातील बारसू हा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. समुद्र किनार्यापासून हे अंतर १५ किलोमीटर आहे. वेस्ट कोस्ट रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रोजेक्ट असे त्याचे नाव आहे. इंडियन आईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या तर सौदी अरामको आणि अबू धाबी न@शनल आ@ईल कंपनी या दोन परदेशी कंपन्या यांची यामध्ये ५०:५० टक्के भागीदारी आहे.
हा प्रकल्प अगोदर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारमध्ये करण्याचे नियोजन होते. त्यासाठी १४,००० एकर जागा ताब्यात घेण्यात येणार होती. पण स्थानिकांनी त्याला विरोध केला. त्यानंतर हा प्रकल्प १५ किलोमीटर अंतरावरील बारसू येथे हलविण्यात आला. प्रकल्पाची क्षमता कमी करण्यात आली. ६,२,०० एकर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला. याप्रकल्पाला पण विरोध सुरु आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात माती परीक्षणाला विरोध करण्यात आला होता. तUकोकणातील हा प्रकल्प वादात असला तरी त्यासंदर्भातील सर्वेक्षणाची कामे प्रगतीपथावर आहेत.