कोकण रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून धावणार फेस्टिवल स्पेशल गाडी

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी त्री – साप्ताहिक विशेष गाडी १ नोव्हेंबर पासून चालवण्यात येणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम ( ०११२९ ) ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी गाडी दिनांक १ नोव्हेंबर पासून दर बुधवार , शनिवार तसेच सोमवारी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटेल . मुंबईतून सुटलेली ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गोव्यात पोहोचेल . परतीच्या प्रवासात ही गाडी ( ०११३० ) थिवीम ते लोकमान्य टिळक टर्मिनस अशी धावताना दिनांक २ नोव्हेंबर पासून गुरुवार , शनिवार तसेच मंगळवारी धावणार आहे . ही गाडी थिवीम स्थानकावरून दुपारी ३ वाजता सुटून दुसऱ्या दिवशीच्या पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी ती मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचणार आहे . ठाणे , पनवेल , रोहा , माणगाव , वीर , खेड , चिपळूण , संगमेश्वर , रत्नागिरी , आडवली , विलवडे राजापूर रोड , वैभववाडी , नांदगाव , कणकवली , सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी असे थांबे आहेत.