रत्नागिरी:- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा मंगळवारी १३ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २७,८४१ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड राज्यात प्रथम येणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर १० दिवसांच्या आत निकाल लागेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळं विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर उद्या १० वीचा निकाल लागणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येतील.
दरम्यान, कोकण विभागात इयत्ता दहावीसाठी
२७,८४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. रत्नागिरीत ७३ व सिंधुदुर्गमध्ये ४१ अशी ११४ परीक्षा केंद्र होतील. तसेच रत्नागिरी मध्ये १३ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ असे एकूण २२ परीरक्षक कार्यरत होते. रत्नागिरी जिल्ह्यात ४३४ शाळा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२३ अशा ६५७ शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.