कोकणच्या राजाला बेगमीपासून ते निर्यातीपर्यंत मिळणार संरक्षण

आंबा बोर्ड स्थापन होताच आराखडा होणार कार्यान्वित

रत्नागिरी:- शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, तशी मागणी कोकणातील बागायतदारांनी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल. आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणार्‍या नुकसानीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. कोकणच्या राजाचा बेगमीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आंबा बोर्ड स्थापन झाल्यानंतर हा आराखढा कार्यान्वयीत करण्यात येणार आहे.

आंब्यासाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. त्यासाठी 200 कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. बोर्डाच्या समितीवर शासकीय अधिकार्‍यांबरोबर अशासकीय सदस्य म्हणून बागायतदारांच्या संघटनेतील दोन सदस्यांना घेण्यात येणार आहे. शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी दोन्ही जिल्ह्यातील बागायतदरांच्या संयुक्त संघटनेने मागणी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल. आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणार्‍या नुकसानीवरही कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे. आंबाफळाच्या सुरुवातीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आंबा मंडळाच्या प्राथमिक प्रक्रियेत हे मुद्दे बोर्डाच्या अजेंड्यावर राहणार आहेत.
पाच वर्षांपूर्वीच्या काजू आणि आंबा बोर्डालाही मोठा निधी मंजूर झाला होता. त्याचे काम सुरू आहे; परंतु आता आंब्यासाठी हे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आंबा बोर्डामुळे कोकणातील बागायतदारांना औषधांसह बागांच्या देखभालीसाठी आवश्यक साहित्य खरेदीला अनुदान मिळणार आहे.