कृषी उत्पन्न बाजार समितीचे होणार विभाजन 

रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी…कारण रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन होणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्याची एकमेक कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी शहरालगत आहे. पण रत्नागिरी जिल्ह्याच्या टोकावरती असणाऱ्या शेतकऱ्यांना या कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपयोग शुन्य. त्यामुळे जिल्ह्याच्या सिमेवर म्हणजेच टोकावर असणाऱ्यांसाठी शिवसेना आमदार योगेश कदम यांनी रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा प्रस्ताव पणन मंडळाकडे दिला होता. त्या प्रस्तावाला अनुकुलता दर्शवण्यात आलीय. रत्नागिरी शहरालगतची कृषी उत्पन्न बाजार समिती सोडून एक कृषी उत्पन्न बाजार समिती मंडणगड तर दुसरी राजापूर मध्ये सुचवण्यात आलीय. या संदर्भातील अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी सर्व्हे करून पणन महामंडळाला सादर केलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दापोलीतील शेतकऱ्यांकडून मोठं उत्पन्न मिळते. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना वेगळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीच्या आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. त्यामुळे पणन मंडळाकडून ग्रिन सिग्नल आल्यावर लवकरात लवकर मंडणगड आणि राजापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीचा मार्ग मोकळा होणार आहे.