रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आडिवरे येथील महाकाली मंदिराला रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी रात्री आडिवरे परिसरात मेघगर्जनेसह ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने महाकाली मंदिराच्या आवारात आणि सभामंडपात पहिल्यांदाच पावसाचे पाणी साचले आहे. मंदिरात पाणी आल्याचे पाहून अनेक ग्रामस्थ अचंबित झाले आहेत.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ४० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी मंदिरात कधीही शिरले नव्हते. रात्री झालेल्या प्रचंड पावसामुळे मंदिराच्या परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते आणि मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी पोहोचले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण हे मंदिर त्यांच्या श्रद्धेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.