Saturday, September 5, 2026
spot_img
Home सांस्कृतिक रत्नागिरी जिल्ह्यात २,५७८ दहीहंड्यांचा थरार रंगणार

रत्नागिरी जिल्ह्यात २,५७८ दहीहंड्यांचा थरार रंगणार

सार्वजनिक हंड्या घटल्या, तर खासगी आयोजनात वाढ

रत्नागिरी:- शनिवार, ५ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या दहीकाला उत्सवासाठी जिल्ह्यात गोविंदा पथके पूर्णपणे सज्ज झाली असून यंदा एकूण २ हजार ५७८ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पथकांकडून कसून सराव केला जात असून शहरासह ग्रामीण भागातही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

दहीहंडी हा अगदी पुराणकालापासून हिंदू धर्मातील एक पवित्र व पसिध्द सण म्हणून याकडे पाहिले जाते. दही हंडी या कीडा पकारातून युवकांच्या कौशल्याची परिक्षा होते, त्यांचा कस लागतो. या स्पर्धेतून युवकांना, बाळ गोपाळांना एक वेगळा आनंद मिळत असतो. युवकांसाठी, लहान मुलांसाठी हा एक मोठा सणच असतो. असा हा उत्सव उद्या शनिवार 5 सप्टेंबर रोजी सर्वत्र साजरा होणार आहे.

जिल्हयात उभारण्यात येणाऱया विविध शहरातील पाच ते सहा थर असणाऱया हंड्या फोडण्यासाठी जिल्हयातील पथकांसह जिह्याबाहेरची पथकेही येतात. सध्या दहीहंडयांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या किंमतीतही स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे सध्या दहीहंडीला राजकीय स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विविध ठिकाणी राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून हजारों ते लाखों रुपयांची बक्षिसे गोविंदापथकांसाठी व त्या नियोजनावर पैशांचा मोठा चुराडा केला जात आहे. अशा या दहीहंडी उत्सवासाठी रत्नागिरी जिल्हयातील गोविंदा पथक सज्ज झाली झालेली आहेत. सर्वाधिक दहीहंडया जयगड, खेड, दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, मंडणगड, बाणकोट, दाभोळ येथे फोडण्यात येणार आहेत.

यावर्षी जिल्ह्यात २८५ सार्वजनिक आणि २ हजार २९३ खासगी दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सार्वजनिक दहीहंड्यांच्या संख्येत १८७ ने घट नोंदवली गेली असली, तरी खासगी दहीहंड्यांमध्ये १५ ने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय पक्षांनीही या उत्सवाचे औचित्य साधत लाखो रुपयांची घसघशीत बक्षिसे जाहीर केल्याने गोविंदा मंडळांमधील चुरस शिगेला पोहोचली असून, बक्षिसांवर नाव कोरण्यासाठी आणि जल्लोष साजरा करण्यासाठी मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.