बुधवारी निवडणूक; सभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या विषय समिती सभापतीपदांच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच महत्त्वाच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या सर्व नियुक्त्या केवळ सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून आधीच जाहीर करण्यात आला होता. बुधवार २५ मार्च रोजी या निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात विषय समित्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. धोरणात्मक निर्णय घेणे, विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विभागनिहाय कामकाजावर नियंत्रण ठेवणे, यामध्ये सभापतींची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, अनुभवी आणि अभ्यासू सदस्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये विलास चाळके उपाध्यक्ष (बांधकाम व आरोग्य विभाग), मयुरी मिलींद शिर्के: सभापती (महिला व बालकल्याण विभाग), महेश राघू नाटेकरः सभापती (कृषि व पशु संवर्धन विभाग), अॅड. सुयोग नंदकुमार कांबळे: सभापती (समाजकल्याण विभाग), नंदकुमार नारायण मुरकरः सभापती (अर्थ व शिक्षण विभाग) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या सर्व नियुक्त्या करताना पक्षांतर्गत शिस्त आणि सर्वांना कामाची संधी मिळावी, या उद्देशाने ‘सव्वा वर्षाचा’ कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार ही नाव निश्चिती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका आणि ग्रामीण भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी या पाचही सभापतींना आता वेगाने काम करावे लागणार आहे.
या सर्व नियुक्त्या करताना पक्षांतर्गत शिस्त आणि सर्वांना कामाची संधी मिळावी, या उद्देशाने ‘सव्वा वर्षाचा’ कार्यकाळ निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार ही नाव निश्चिती करण्यात आली आहे. आगामी निवडणुका आणि ग्रामीण भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी या पाचही सभापतींना आता वेगाने काम करावे लागणार आहे.









